जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत…..
प्रस्तावना
जुलै, २०२१ मध्ये झालेलया अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेलया पुररिस्थितीमुळे राज्यातील काही जिल्हयांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे जिल्हा निहाय यादी. या पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत दिनांक ०३.०८.२०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार मदतीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार तसेच येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांचेकडुन प्राप्त झाले आहेत. त्यानुसार बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी निधी मंजूर
शासन निर्णय
जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे मृत जनावरांसाठी मदत, पुर्णत: नष्ट/अंशत: पडझड झालेली कच्ची/पक्की घरे, झोपडी, गोठे, मत्स्य बोटी व जाळयांसाठी अर्थसहाय्य, मत्स्यबीज शेतीसाठी अर्थसहाय्य, दुकानदार, टपरीधारक व कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबींकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रांत दर्शविल्याप्रमाणे एकूण रु ५५४८७.५३ लाख ( अक्षरी रुपये पाचशे चौपन्न कोटी सत्याऐंशी लाख त्रेपन्न हजार फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्हयांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा
Pik noksan
Pik noksa