नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५०,००० अनुदान देण्यात येणार होते. हे अनुदान दरवर्षी कर्जाची परतफेड करत असणाऱ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार होते. हे प्रोत्साहन पर अनुदान रक्कम आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय हा आज प्रकाशित करण्यात आलेला आहे. Niyamit Karjmafi 50,000 Anudan आजच्या या पोस्टमध्ये कर्जमाफी ५० हजार रुपये अनुदान संबंधित संपूर्ण माहिती आणि कर्जमाफी ५०,००० अनुदान यादी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत शासनाने शासन निर्णय प्रकाशित करून निधी हा वितरित केलेला आहे. Niyamit Karjmafi ५०,००० अनुदान योजना शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra : आपल्या महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही २०१९ मध्ये राबविण्यात आलेली होती. त्यानुसार जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करत होते, अश्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी योजने अंतर्गत ५०,००० रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, कारण की नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी योजना अंतर्गत लाभ मिळाला नव्हता. त्याच अनुषंगाने आता अशा शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपये अनुदान योजनेची रक्कम जमा करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज शासन निर्णय प्रकाशित करून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी २,३५० कोटी रुपये इतका निधी हा वितरित केलेला आहे. ही रक्कम लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शासनाने ही रक्कम वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. या संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी त्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून आपण तो शासन निर्णय डाऊनलोड करून 50,000 Anudan Yadi याची माहिती मिळवू शकतात.
संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा